म्हाळुंगी नदीवरील पुलाचे कामाला गती
By Admin 2025-02-28
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर शहरातील नागरिकांना दोन महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होणार
संगमनेर - गेल्या अनेक महीन्यापासून वादग्रस्त राहिलेल्या शहरातील म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या दोन महिन्यात ह्या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीच खुला होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनची संगमनेरकरांची गैरसोय दूर होणार आहे.
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील पूल दोन वर्षा पुर्वी खचला होता. यामुळे साईनगर, ओहरा कॉलेज, पंपिंग स्टेशन, साई मंदिर, प्रवरा नदीवरील जाण्या येण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. हा पूल दुरुस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. संगमनेर नगरपालिका, सार्वजनिक बांधकामविभाग लोकप्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना साकडे घालून या फुलाचे काम मार्गी लावण्या संदर्भात मागणी केली होती. तात्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले होते. नगरपालिकेवर मोर्चाही काढण्यात होता, मात्र त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत नागरिकांची हेळसांड केली,अपमानास्पद वागणुक दिली.