दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरची घडी विस्कटते, नागरिक हवालदिल : राजकीय दबावातून अवैध धंद्यांना चालना
संगमनेर ( प्रतिनिधी ) शांत,सुसंस्कृत आणि वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरात मागील एक वर्षापासून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून अवैध धंदे वाढले आहेत. दादागिरी, दहशतवादी सह अमली पदार्थांची होणारी तस्करी हा नागरिकांमध्ये भीतीचा विषय झाला असून या परिस्थितीबाबत महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली होती.