रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
पिंपळगाव देपा, सायखिंडीसाठी टँकर मंजूर संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई; दरेवाडी, वरवंडीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल By Admin 2025-03-05

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पिंपळगाव देपा, सायखिंडीसाठी टँकर मंजूर संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई; दरेवाडी, वरवंडीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल

संगमनेर तालुक्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवत आहे. यामुळे सायखिंडी व पिंपळगाव देपा या दोन गावांच्या टँकर मागणीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच या गावांसाठी टँकर सुरू होणार आहेत. दरम्यान, वरवंडी व दरेवाडी या दोन गावांनी टैंकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. उन्हाळा सुरू होतात तालुक्यात पाणी टंचाई जाणू लागते, मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडी उशिरा टंचाई जाणवत आहे. २०२३ यावर्षीडिसेंबर महिन्यातच टँकर सुरू झाला होता. फेब्रुवारी २०२४ मध्ये २ टैंकर सुरू करण्यात आले होते. पावसाने दडी मारल्यामुळे ऑगस्ट अखेर टैंकर सुरू होते, मात्र यंदा मार्चच्या सुरूवातीला टैंकर सुरू झाले नाही. सायखिंडी व पिंपळगाव देपा या दोन गावांनी टँकरची मागणी केली होती. यानुसार या गावांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. दरेवाडी व वरवंडी गावांनी टैंकर मागणीचे प्रस्ताव दाखल केले, मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. पंचायत समितीने तालुक्यातील यंदाची पाणी टंचाई लक्षात घेता, टंचाई आराखडा सादर केला आहे. तीन-तीन महिन्यांचे दोन भाग केले आहेत. जूनअखेर ६१ गावे व त्या गावांतर्गत वाड्यांना २० टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, असा अंदाज गृहीत धरून, टंचाई आराखडा सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजूरी दिली आहे.

संगमनेर तालुक्यात उन्हाळ्याची चाहुल लागताच अनेक गावात पाणी टंचाई जाणवते. यामुळे ग्रामपंचायत आगामी पाणी टंचाई लक्षात घेता, पंचायत समितीकडे टंचाई आराखडा सादर करुन, टँकरची मागणी करतात. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. अशात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने संगमनेर तालुक्यात विहिरींनी तळ गाठला होता. यामुळे २०२४ मध्ये ऑगस्ट अखेर टँकर सुरू होते.

Special Offer Ad