शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |      दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी     |     
यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान By Admin 2025-08-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान

संगमनेर  : तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी संगमनेरमधील कीर्तनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना इशारा देताना आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागले, अशी भाषा वापरली होती.

यावर बाळासाहेब थोरातांनी आज पत्रकार परिषद घेत, 'मी काही महात्मा गांधी नाही अन् होऊ शकत नाही. परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील', असा मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागले आहेत.

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत संगमनेरमधील कीर्तनातील राजकीय गोंधळावर भाष्य केले. तसेच तथाकर्थित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी नथुरामजी गोडसे होण्याची वापरलेली भाषेवर प्रतिक्रिया देताना, कीर्तनकारांची पथ्य काय? राज्यघटनेतील मुलभूत तत्व काय आहेत? याची मांडणी करताना विरोधकांना सुनावलं आहे.

संग्रामबापू भंडारे यांनी, मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, "संगमनेरच्या (Sangamner) घुलेवाडीतील कीर्तनात घडलं काय, त्यावर त्यांना कुणी थांबवलं नाही. परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून, ज्यावेळेस ते इकडचे-तिकडचे, दुसरे विषय बोलायला लागले, स्थानिक राजकारणावर बोलायले लागले, राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वावर बोलायला लागले, नकारात्मत बोलायला लागेल, तेव्हा एका युवकाने उभं राहून, महाराज तु्म्ही अभंगावर बोला, एवढचं म्हटला."

'कीर्तनात काय काय वक्तव्य केले महाराजांनी, तर ते तथाकथित महाराज आहे. खऱ्या वारकारी संप्रदायाच्या परंपरेत काही असे घुसले आहेत, राजकारण करण्यासाठी घुसले आहेत, त्यातला तो प्रकार आहे. आणि त्यानंतर त्याने जे केलं, कुणीही त्यांचं कीर्तन तिथं थांबवलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, त्यांच्या गाडीची तोडफोड झालेली नाही, तिथं पत्रकार मंडळी होती. त्यांना सर्व माहिती आहे', असे थोरातांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.

Special Offer Ad