राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे By Admin 2025-08-25

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे

संगमनेर  : लाडकी बहीण योजनेचे हप्ते थोडेफार मागेपुढे झाले असले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय देखील महायुतीच्या अजेंड्यावर आहे. सध्या थोडी तारेवरची कसरत करावी लागत असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे काल प्रथमच संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. सभेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर येथील जाणता राजा मैदानावर विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.

आमदार खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह महायुतीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की, आपली लढाई सत्तेसाठी – खुर्चीसाठी नसून, ज्यांनी आपल्याला खुर्चीवर बसवले त्यांच्यासाठी आहे. आमदार खताळ यांना इथल्या जनतेने मोठी संधी दिली असून, त्या संधीचे ते निश्चित सोने करतील. जनतेशी बेइमानी करणाऱ्यांना २०२२ मध्ये आपण बाजूला केले. त्यानंतरच्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यात जो विकास केला त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिली. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या लोकांना बहिणींनी २३२ नंबरचा जोडा हाणत घरी बसवले.

Special Offer Ad