रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे By Admin 2025-08-25

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे

संगमनेर  : लाडकी बहीण योजनेचे हप्ते थोडेफार मागेपुढे झाले असले तरी ही योजना कधीही बंद होणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय देखील महायुतीच्या अजेंड्यावर आहे. सध्या थोडी तारेवरची कसरत करावी लागत असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे काल प्रथमच संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. सभेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर येथील जाणता राजा मैदानावर विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते.

आमदार खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह महायुतीच्या सर्व पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की, आपली लढाई सत्तेसाठी – खुर्चीसाठी नसून, ज्यांनी आपल्याला खुर्चीवर बसवले त्यांच्यासाठी आहे. आमदार खताळ यांना इथल्या जनतेने मोठी संधी दिली असून, त्या संधीचे ते निश्चित सोने करतील. जनतेशी बेइमानी करणाऱ्यांना २०२२ मध्ये आपण बाजूला केले. त्यानंतरच्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यात जो विकास केला त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने दिली. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या लोकांना बहिणींनी २३२ नंबरचा जोडा हाणत घरी बसवले.

राज्यात महायुतीचे सरकार आले आहे हे अद्यापही महाविकास आघाडी मानायला तयार नाही. जनतेने त्यांना एवढा मोठा झटका दिलाय की ते त्यातून बाहेर पडायलाच तयार नाही. मत चोरी झाली म्हणततात मग गेल्या ५०-६० वर्षांत विविध घोटाळ्यांच्या माध्यमातून यांनी किती चोऱ्या केल्या, हेही तपासले पाहिजे. ऑपरेशन सिंदूर, महादेव यावर संशय व्यक्त करणारे, वारकऱ्यांचा अपमान करणारे हिंदू असू शकत नाही. आमदार खताळ यांना निवडून देत इथली जनता खरी 'जायंट किलर' ठरली असून, त्यांच्या मागे आपण भक्कम उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकामध्ये आमदार खताळ यांनी मंत्री एकनाथ शिंदे व राधाकृष्ण विखे यांनी दिलेली संधी आणि त्याला मिळालेल्या जनतेच्या साथीचे सोने करणार असल्याचे सांगितले. पुणे – नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे न्यावा, तालुक्यात एमआयडीसी मंजूर करावी, सुसज्ज रुग्णालयाबरोबरच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी वाढीव जागा द्यावी, पेमगिरीच्या शहागड किल्ल्याच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी त्यांनी केली. सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले.

Special Offer Ad