राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा -- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी By Admin 2025-04-03

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा -- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी

संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना  सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.



संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर ,धांदरफळ खुर्द या गावांमध्ये अवकाळी पाऊस व जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे होणे नाले तसेच डोंगरकडेही काही वेळ जोरात वाळू लागले होते . शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून उभे केलेले कांदा ,उन्हाळी बाजरी, गहू, डाळिंब या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हा सातत्याने मोठ्या संकटात असून अवकाळी पावसाने हातात आलेली पिक वाया गेली आहे.

Special Offer Ad