राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
शहरातील शांतता व एकतेसाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा - भाईजान By Admin 2025-11-30

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांना नागरिकांची मोठी गर्दी

संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात सर्व विकासकामे मार्गी लागली आहे. शांतता सुव्यवस्था आहे मात्र काही लोक भेदभाव निर्माण करून आपल्यामध्ये फूट पाडतील. संगमनेर शहर व तालुका हा एकतेचा परिवार असून शहरातील शांतता व एकता जपण्यासाठी नागरिकांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन हज यात्रा कमिटीचे अध्यक्ष भाईजान यांनी केले आहे.

सय्यद बाबा चौक येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बहुजन वंचित आघाडीचे अजीज ओरा,उमेदवार किशोर टोकसे,प्रियंका शहा, डॉ. दानिश, सरोजना पगडाल, लाला पठाण, नसीब बानो पठाण, अमजद खान पठाण, शकीला बेग, नूर मोहम्मद शेख,शकील पेंटर, बिंडू भाऊ जहागीरदार यांसह विविध उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाईजान म्हणाले की, माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात विकासाची खूप कामे झाली आहे. निळवंडे धरण पूर्ण करून 38 किलोमीटरची पाईपलाईन टाकून त्यांनी सर्व शहरवासीयांना स्वच्छ व मुबलक पाणी दिले आहे. तालुका व शहर परिवार मानले. कधीही भेदभाव केला नाही. सर्व समाजाच्या नागरिकांना विकासाची समान संधी दिली. या शहरांमध्ये सर्व समाजाचे नागरिक आनंदाने एकत्र राहत आहेत. विकासाची वाटचाल कायम ठेवायची आहे.

Special Offer Ad