नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
वादळाचा तडाखा; १२ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान'; पाेटाला चिमटा काढून उभारलेला संसार पाण्यात.. By Admin 2025-05-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




वादळाचा तडाखा; १२ आदिवासी कुटुंबांच्या घरांचे नुकसान'; पाेटाला चिमटा काढून उभारलेला संसार पाण्यात..

संगमनेर  : संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजवला असून वनकुटे (ता. संगमनेर) येथील पाबळपठार भागात वादळाने अक्षरशः थैमान घातले. जोरदार वाऱ्यामुळे १२ आदिवासी कुटुंबांची घरांचे मोठे नुकसान झाले असून, संसारोपयोगी साहित्यही पूर्णतः नष्ट झाले आहे.

 या घटनेत एकूण १० लाख २५ हजारांचे नुकसान झाले आहे.

पाच ते सहा दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि अधूनमधून अवकाळी पावसाचे सत्र सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले असून यामुळे शेतमाल, घरबांधणी आणि जनावरांचे देखील मोठे नुकसान होत आहे. पाबळपठार परिसर हा डोंगर उतारावरील अतिदुर्गम भाग असून येथे वास्तव्यास असलेली आदिवासी कुटुंबे मजुरीवर उपजीविका करत आहेत. वादळामुळे अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले, काहींच्या घरांच्या भिंती पूर्णतः कोसळल्या. घरात ठेवलेले कपडे, धान्य, भांडीकुंडी, यांनाही वाऱ्याचा फटका बसला. अनेक कुटुंबांनी आरडाओरड करत घराबाहेर धाव घेतल्याने ते बालंबाल बचावले आहेत.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अंदाज नोंदवला. त्यानुसार एकूण १० लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्याच्या इतर भागांतही या वादळी हवामानामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फळबागांना देखील फटका बसणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. यापूर्वीही तालुक्यात अनेकदा अवकाळी पावसामुळे शेतकरी व गरीब कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

डिग्रस गावात विजेचा कहर, दोन गायी ठार

तालुक्यातील दुसऱ्या टोकाला असलेल्या डिग्रस गावात विजांचा जोरदार गडगडाट सुरू असताना विज पडून केरू यशवंत खेमनर या शेतकऱ्याच्या दोन गायी जागीच ठार झाल्या. या घटनेमुळे त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी देखील खेमनर यांनी केली आहे.