दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
दूधगंगा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे न्यायासाठी साकडे
संगमनेर :
सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, दूधगंगा पतसंस्थेमध्ये ८१ कोटींचा अपहार झाला आहे.
या अपहारामागे पतसंस्थेच्या चेअरमनसह मॅनेजर व इतर २१ आरोपी सिद्ध झालेले आहे.
ठेवीदारांना ठेवी परत मिळत नसल्याने गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, टपरीधारक, छोटे व्यावसायिक यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुला मुर्लीचे शिक्षण, त्यांचे लग्न कार्य, आजारपण, दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाले आहे.
गेल्या दीड वर्षापासून २ हजार ठेवीदारांचे कष्टाचे, मेहनतीचे पैसे दुधगंगा पतसंस्थेत अडकलेले आहे. वारंवार चकरा मारून देखील पैसे दिले जात नाही. त्यामुळे ठेवीदारांचे
दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण, लग्न कार्ये, घरातील आजारपणासाठी लागणारा खर्च इत्यादी कामासाठी पैसे मिळत नाही. या गोष्टीला कंटाळून आत्तापर्यंत १० ठेवीदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. काहीजण आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असल्याचे म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक आदींना पाठविण्यात आल्या आहेत.