नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
प्रभू श्रीरामांचे दर्शन अवघ्या काही तासात! नाशिक ते अयोध्या विमानसेवा सुरु By Admin 2025-04-01

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




प्रभू श्रीरामांचे दर्शन अवघ्या काही तासात! नाशिक ते अयोध्या विमानसेवा सुरु

नाशिक: नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिककरांना आता प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणे सहज शक्य होणार आहे. कारण नाशिक ते अयोध्या अशी विमानसेवा सुरु होत आहे.

 नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्च मध्यरात्री पासून प्रमुख पस्तीस शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधून आता श्रीनगर आणि अयोध्येचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येणार आहे. नाशिक ते अयोध्या विमानसेवा सुरु झाल्याने भाविकांना आता या तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेणे अधिक सोपे होणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन 31 मार्चपासून देशातील 35 प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरु होणार आहे. यामध्ये अयोध्या, दरभंगासह, तिरुपती, श्रीनगर, चंदिगड, गुवाहाटी, कोइंबतूर, कोलकाता अशा 35 प्रमुख शहरांचा समावेश आहे.

नाशिकच्या ओझर विमानतळावरुन अवघ्या काही तासात तुम्ही कोईमतुरपर्यंत जाऊ शकता. त्यामुळे उटीला जाण्यासाठी सुलभता होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे. देशातील सर्वच भागात सुरु होणाऱ्या विमानसेवेमुळे नाशिकमध्ये दळणवळण वाढणार आहे. साहजिकच त्याचा फायदा शहराच्या पर्यटनाला आणि उद्योगाला होणार आहे. तसेच रोजगार वाढण्यासही मदत होणार आहे.