राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे By Admin 2025-12-01

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर मध्ये दहशत व गुंडगिरी खपवून घेणार नाही

संगमनेर (प्रतिनिधी) - लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे एक परिवाराप्रमाणे आहे. येथे सर्व समाजाचे लोक आनंदाने राहतात की परंपरा आपल्याला जपायची आहे. तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून गुंडगिरी व दडपशाही करणारी प्रवृत्ती संगमनेर मध्ये खपवून घेणार नाही. असा इशारा देत संगमनेर शहराचा परिपूर्ण आराखडा राबवणार असून विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पीएचडी असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.

चैतन्य नगर, मालदाड   रोड, मेन रोड, घोडेकर मळा येथे झालेल्या बैठकांमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उत्कर्षाताई रुपवते, उमेदवार शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, प्रसाद पवार, नितीन अभंग, मालती डाके, दिपाली पांचारिया ,किशोर टोकसे, गजेंद्र अभंग ,गणेश गुंजाळ, श्रीमती विजया गुंजाळ, डॉ.दानिश यांच्यासह विविध उमेदवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, संगमनेर शहराची विकासातून मोठी वाटचाल झाली आहे. मोठमोठ्या विकासाच्या योजना मार्गी लागल्या आहेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्याबरोबर पस्तीस गार्डन निर्माण केली आहे. मात्र मागील चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असून प्रशासक ही सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करते. विकास कामे रखडली आहेत. आम्हाला सभेच्या परवानगी मिळू नये म्हणून प्रशासन दबावाखाली परवानगी देत नाहीत.

Special Offer Ad