विकासासाठी निधी आणण्यात आमची पीएचडी - आ. सत्यजीत तांबे     |      संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा     |      म्हाळुंगी पुलाच्या बदनामीवरून आ.तांबे यांचा सेनेच्या शहर प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार अर्ज     |      खा. श्रीकांत शिंदे यांचा संगमनेरात फ्लॉप शो     |      शांत संयमी मा.आ.डॉ.सुधीर तांबे कडाडले     |      संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध राहून शहरवासीयांचा विकास सार्थ ठरवणार - डॉ.मैथिलीताई तांबे     |      सोमवारी सेवा समितीची प्रचार यात्रा व जाहीर सभा......     |      शहरातील शांतता व एकतेसाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा - भाईजान     |      संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?     |      एकनाथ शिंदेंचा लाडका आमदार अमोल खताळ अडचणीत; निवडणुकीच्या तोंडावरच 'ती' ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल     |     
खा. श्रीकांत शिंदे यांचा संगमनेरात फ्लॉप शो By Admin 2025-12-01

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर करांनी पाठ फिरवल्याने रॅली सह सभा रद्द करण्याची नामुष्की

संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर शहर ही सुसंस्कृत शहर आहे .मागील एक वर्षापासून संगमनेरातील दहशत आणि दडपशाही विरुद्ध संगमनेरकर एकवटले असून शिंदे सेनेच्या वतीने आयोजित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीचा फ्लॉप शो झाला असून नागरिकांच्या अनुपस्थितीमुळे रॅली सहसभा रद्द करण्यात झाली आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीला संगमनेर शहरातील नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे.

संगमनेर शहरांमध्ये मागील एक वर्षापासून वाढलेली गुंडागर्दी ,अमली पदार्थांची तस्करी, दडपशाही, दादागिरी, या विरुद्ध संगमनेरकर एकवटले आहे संगमनेरची शांतता सुव्यवस्था व वैभवशाली परंपरा टिकवण्यासाठी तमाम संगमनेरकर एकत्र झाल्याने विरोधी महायुतीची त्रिधात्रीपट उडाली आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांच्या उमेदवारीवरून शिंदे सेनेमध्ये ही उभी फूट पडल्यानंतर भाजपच्या निष्ठावंतांनी ही बंड पुकारले. लाभोपाठ नागरिकांनी पाठ फिरवल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची रॅली आयोजित करण्यात आली.

या रॅलीसाठी खेड्यापाड्यातून युवकांना बोलवण्यात आले. मात्र नागरिकांचा निरुत्साह. आणि युवकांचा सहभाग नसल्याने ही रॅली पूर्णपणे फ्लॉप ठरली. शहरवासी यांचे आणि तालुक्याचे लक्ष लागलेल्या या रॅलीमध्ये नागरिकांनी युवक नसल्याने मध्यावर्ती ठिकाणी रॅली बंद करावी लागली.

Special Offer Ad