राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना शहरवासी यांचा मोठा पाठिंबा By Admin 2025-12-01

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




सुसंस्कृत संगमनेर शहरासाठी सर्व नागरिक एकवटले

संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कृत आणि वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात विकासाच्या पायाभूत सुविधा राबविण्यात आले आहेत. सर्वांसाठी आस्तेचे आणि सुरक्षिततेचे असलेल्या संगमनेर शहरात मागील एक वर्षापासून वाढलेली गुंडगिरी दहशत थांबवण्यासाठी संपूर्ण संगमनेरकर एकवटले असून संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा वाढला आहे.

प्रभाग एक ते पंधरा मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीचे सर्व उमेदवार नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहे. याचबरोबर निघणाऱ्या रॅली पदयात्रा यांना शहरातील नागरिक महिला व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून संगमनेर शहराच्या एकतेसाठी नागरिक एकवटल्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, 1991 पासून संगमनेर शहराची नगरपालिका अत्यंत चांगले काम करत असून आदर्शवत योजना राबवले आहेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निळवंडे धरण 38 किलोमीटरची थेट पाईपलाईन योजनेमुळे संगमनेर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. आरो वापरण्याची गरज नाही. असे पाणी असून शांतता, सुरक्षितता यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी संगमनेर मध्ये येत आहेत मात्र मागील एक वर्षापासून चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शहराला पुन्हा वैभवशाली बनवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. थेट संपर्क आणि तात्काळ तक्रार निवारण हे वैशिष्ट्य घेऊन आगामी सेवा समितीचे सर्व उमेदवार काळात काम करणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

Special Offer Ad