दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरचे बिघडलेले वातावरण दुरुस्त करण्यासाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे राहा माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर (प्रतिनिधी)--1991 पूर्वी गोंधळ असलेल्या नगर परिषदेला आदर्श शिस्त लावली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर उभे केले. शुद्ध पाणी शहरात मिळत आहे सुसंस्कृत व शांततेचे वातावरण आहे. वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत .रस्त्यांसह अनेक कामे मार्गी लागली आहेत. सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे .मात्र मागील एक वर्षांमध्ये काही अपप्रवृत्ती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत असून संगमनेर शहराची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
गणेश नगर व जयहिंद सर्कल येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेचे बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब ,वाकचौरे आमदार सत्यजित तांबे, उमेदवार दिलीपराव पुंड ,सौ सीमा खटाटे, भारत बोराडे सौ अर्चना दिघे, पांडुरंग घुले, श्याम शेठ पारख, अजित काकडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की 1991 पासून संगमनेर शहराला आदर्श शिस्त लागली. विकासाच्या अनेक योजना राबवल्या. तीस वर्षाच्या कार्यकाळात एकमताने सर्व ठराव पास झाले. एकदाही वाद झाला नाही. शहरासाठी आपण सातत्याने निधी आणून मोठमोठी विकास कामे मार्गी लावली. हायटेक बस स्थानक ,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय ,पंचायत समिती, यांसह इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक आदर्श रस्ता बनवला. 35 गार्डन निर्माण झाली.
निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले शहरासाठी स्वतंत्र 38 किलोमीटरची पाईपलाईन टाकून पाणी आणले. शहरांमध्ये पूर्ण नवीन पाईपलाईनचे जाळे तयार केले. नवीन पाण्याच्या टाक्या तयार केल्या. त्यातून आज सर्वांना स्वच्छ पाणी मिळत आहे. या पाठीमागे कोणाच्यातरी कष्ट आहे. आपोआप होत नाही .सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. सर्वधर्मसमभावाचे हे शहर आपण जपले शैक्षणिक व सुसंस्कृत वातावरण निर्माण केले. हे सर्वांनी जपले पाहिजे.
मात्र मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. या पाठीमागे कोण आहे. तपासले पाहिजे. गुंडागर्दी वाढली आहे. पोलीस स्टेशन मध्ये मारामाऱ्या होत आहेत. ड्रग्स रॅकेट चालवणारा संगमनेर बस स्थानकासमोर झालेल्या मोर्चा मध्ये स्टेजवर बसतो आहे .यांना कोण परवानगी देतो हे तपासा. आपल्या सर्वांना संगमनेर मधील एक वर्षातील बिघडलेले वातावरण दुरुस्त करायचे आहे सेवा समितीने अत्यंत कार्यक्षम उमेदवार दिले आहे या सर्वांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.