दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
मशाल उत्सव हा महाराजांच्या तेजस्वी स्वराज्याची आठवण करून देणारा - डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी ) शहाजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या शहागडाला मोठे ऐतिहासिक महत्व असून दीपावलीनिमित्त शंभूराजे परिवाराच्या वतीने होणारा मशाल महोत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या तेजाची आठवण करून देणारा ठरत असल्याचे गौरव उद्गार कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी काढले आहे.
पेमगिरी येथे आई पेमाई देवीच्या गोंधळा निमित्ताने छत्रपती शंभुराजे परिवाराच्या वतीने आयोजित मशाल महोत्सवाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अनिकेत मंडलिक, सुनील ठाकरे, संदेश वाळुंज, विश्वा जाधव, राहुल राजपूत,धीरज कदम, प्रगती डोंगरे,धनश्री शेवाळे, प्रसाद मंडलिक, सतीश कोल्हे,स्वप्निल कोल्हे,सुकन्या तांदळे,गणेश अवताडे,मंगेश गुंजाळ, विष्णू दुबे, मीनानाथ शेळके, अक्षय दुबे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.